शहाण्या माणसाने न्यायालयाची पायरी चढू नये, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती देशातील ९८ हजार ८७० न्यायालयीन प्रकरणे सुरू असलेल्या वादी-प्रतिवादी आणि फिर्यादी आणि आरोपी यांना येत आहे. कारण देशातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयात ९८ हजार ८७० प्रकरणे गेल्या तीस वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आयुष्याची तीसहून अधिक वर्ष न्यायालयाच्या चकरा मारण्यात गेल्याने आता तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न या दाव्यांमधील व्यक्तींना पडला असेल. (4 crore 29 lakh lawsuits-Claims pending in the in Indian Court)