

India Pulses Import
sakal
केंद्र सरकारने एकीकडे ‘कडधान्य मिशन’ची घोषणा केली, मात्र दुसरीकडे आयातीसाठी दारे खुली केली. त्यामुळे कडधान्यांची विक्रमी आयात झाली. कडधान्ये आणि त्यांपासून तयार होणाऱ्या डाळी भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. खरेतर देशात कडधान्यांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना रास्त दरात डाळी व कडधान्ये मिळतील, असे धोरण असायला हवे.