सरकार झुकेपर्यंत आंदोलन - वारीस पठाण

कोंढवा खुर्द - सीएए व एनआरसी कायद्याविरोधात धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या महिला.
कोंढवा खुर्द - सीएए व एनआरसी कायद्याविरोधात धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या महिला.

हडपसर - आमच्या अनेक पिढ्या भारतात राहत आहेत. पण, आता अचानक आपण येथील नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मोदी सरकार केवळ वेगवेगळ्या मार्गाने देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य करीत आहे. मात्र, सरकार झुकेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे प्रतिपादन माजी आमदार वारीस पठाण यांनी केले.

कोंढवा खुर्द येथील मिठानगरमध्ये सीएए व एनआरसी कायद्याविरोधात महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनात पठाण बोलत होते. १० जानेवारीपासून हे आंदोलन सुरू असून, ते कुल जमात तंजमी या संघटनेच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.

पठाण म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो मुस्लिम शहीद झाले. मात्र, आज या समाजावरच सीएए व एनआरसी कायद्याद्वारे अन्याय केला जात आहे. दोन्ही कायदे संविधान व देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहेत. या कायद्यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com