लाॅकडाउनमधील पर्यटन अंगलट, राजगडावर आलेल्या कुटुंबावर मधमाश्‍यांचा हल्ला 

Honeybee
Honeybee

वेल्हे (पुणे) : लॉकडाउनच्या कालावधीत केलेले पर्यटन अंगाशी आल्याची घटना नुकतीच वेल्हे तालुक्‍यात घडली आहे. किल्ले राजगडावर वांजळे (ता. वेल्हे) येथील एकाच कुटुंबातील सात जणांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. 

वेल्हे तालुक्‍यातील वांजळे येथील रामचंद्र केसू धरपाळे (वय 60), सुलोचना अंकुश धरपाळे (वय 45) 
विमल विजय धरपाळे (वय 40),राहुल एकनाथ धरपाळे (वय 13), शितल श्रीरंग धरपाळे (वय 22), 
निकिता रामचंद्र धरपाळे, पुष्पा लक्ष्मण पवार (वय 18) हे किल्ले राजगडवर रविवारी (ता. 31) पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी दुपारी किल्ल्यावरील सुवेळा माचीवरील भिंग असलेल्या ठिकाणी मधमाश्‍यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे येथे उपचारासाठी नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. परंतु, तेथे कोरोनाचे रुग्ण असल्याने 
हे सर्व जण परत वेल्ह्यात आले. आता वेल्ह्यातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत वेल्हे पोलिसांत कोणतीही नोंद नसून, कोणीही पोलिस स्टेशनला तक्रार दिली नसल्याची माहीती सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली. गेल्या सहा महिन्यात किल्ले राजगडावर मधमाश्‍यांच्या हल्ल्याची हि तिसरी घटना आहे. परंतु, लॉकडाउन कालावधीत केलेले हे पर्यटन यांच्या अंगलट आल्याची चर्चा तालुक्‍यात होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com