

सावधान! भाजपच्या विरोधात डिजिटल 'फेक नरेटिव्ह'! कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर लक्ष ठेवावे; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कडक सूचना.
Sakal
पुणे : देशात काँग्रेसच फक्त स्थिर सरकार देऊ शकते असा प्रचार केला जात होता. पण अटल बिहारी यांनी २३ पक्षांसोबतचे स्थिर सरकार चालविले. अणुबॉम्बची चाचणी करून जगभरात भारताचा दबदबा वाढवला. गेल्या १२ वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुशासनासह आर्थिक विकास झपाट्याने होत आहे. पण हे अंतिम ध्येय नाही. सध्या कमळ अर्धवट फुलले आहे, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवून पूर्ण कमळ फुलवायचे आहे. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानातून प्रेरणा घेऊन काम करावे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश यांनी केले.