स्पर्धा परीक्षांचे केंद्र बदलू द्या ; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मागणी

change center of competition exams Demand By Competitive Exam Students
change center of competition exams Demand By Competitive Exam Students

पुणे : 'कोरोना'मुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी गावाकडे अाहेत, त्यामुळे केंदीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) परीक्षांचे केंद्र बदलण्याची संधी मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एमपीएससीने सुधारीत वेळपत्रक जाहीर करताना 'राज्य सेवा पूर्व परीक्षा' १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब- संयुक्त पूर्व परीक्षा २०२०'  ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. तर 'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा' १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

बारामतीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी हे कोरोनाच्या साथीच्या पुर्वी पुण्यात अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्रासाठी पुणे हे ठिकाण निवडले होते. लाॅकडाऊन मुळे विद्यार्थी गावाकडे गेले असून, तेथेच अभ्यास करत आहेत. गावाकडे गेलेल्या ९० टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे पुणे आहे. एकंदरीत कोरोनाची स्थिती पहाता, लवकर  ही स्थिती सुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी पुण्यात येणार नाहीत. त्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली पाहिजे, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे प्रतिनिधी राहूल कवठेकर, विश्वंभर भोपळे यांनी केली आहे.

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा...  

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थी परीक्षेला गेले तर त्यातून संक्रमणाचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र घेण्याची संधी द्यावी, यासाठी १९ दिवस लिंक ओपन करावी. यूपीएससीने देखील अशी संधी दिली आहे, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे प्रतिनिधी महेश बडे, किरण निंभोरे यांनी एमपीएससीकडे केली आहे.
 
अभियांत्रिकी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करा
राज्य सरकारने 'महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९' या पदासाठी ११४५ जागांची भरती काढली आहे. त्यासाठी मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी पार पडली. मात्र, मुख्य परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. हा निकाल लागल्यानंतर मुलाखती होणार आहेत. हा काळ विद्यार्थ्यांसाठी कठिण जात आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेचा निकाल त्वरीत लावून मुलाखतींचे वेळपत्रक निश्चित करा, अशी मागणी  महेश बडे यांनी केली आहे. 

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com