'राज्यपालांनी अंत पाहू नये'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट इशारा

Bhagatsingh_Koshari_Ajit_Pawar
Bhagatsingh_Koshari_Ajit_Pawar

खडकवासला (पुणे) : ‘विधान परिषदेत राज्यपाल यांच्याकडून बारा आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी अंत पाहू नये. या जागांसाठी सरकारने दिलेल्या यादीवर राज्यपालांनी तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांची भेट घ्यावी लागेल, अशी परखड भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.५) मांडली. 

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेच्या बारा सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपला. या जागांसाठी महाविकास आघाडीने १२ जणांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली आहे. परंतु राज्यपालांनी त्यावर आता पर्यत स्वाक्षरी केली नाही.

त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीकडून सर्व नियम- अटी पाळून, कॅबिनेटमध्ये ठराव केला. मुख्यमंत्र्यांद्वारे ही यादी राज्यपालांकडे दिली आहे. सभागृहात महाविकास आघाडीकडे  १७१ आमदारांचे पूर्ण बहुमत हे सिद्ध झाले आहे. तरी देखील यादीवर स्वाक्षरी केली जात नाही. त्यामुळे राज्यपालांची भेट घ्यावी लागेल. त्यांचा अधिकार असला, तरी त्याला काळ-वेळ असला पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या. अधिवेशन तोंडावर असून, ते संपल्यानंतर हे घडले असते तर बरे झाले असते. ते म्हणाले ‘किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडीचे काम सुरू आहे. आघाडीत ते पद काँग्रेसला दिले आहे, त्यावर कोणाला नेमायचे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com