

Democratic Participation: Mobilizing Public Sentiment against Inflation
Sakal
पुणे : ‘‘महागाईचा फटका आज प्रत्येकालाच बसत आहे. मात्र, त्यावर उघडपणे व्यक्त होण्याचे धाडस जनतेत आहे का? जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधकांनी मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलने केली पाहिजेत हे अगदी खरे आहे. पण, विरोधकांच्या मोर्चाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल, जेव्हा झळ सोसणारी सर्वसामान्य जनता त्या मोर्चांमागे ताकदीने उभी राहील,’’ असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.