शेतकर्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी प्रयत्न करणार – दिलीप वळसे पाटील

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी परिसरातील शेतकर्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
pune
punesakal

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी परिसरातील शेतकर्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयासाठी संस्था, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व भीमाशंकर साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या शिक्के काढण्याबाबत प्रश्न उपस्थित केला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संचालक प्रदीप वळसे पाटील, सभापती संजय गवारी, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, पप्पु दौंण्ड,शरद बँकेचे संचालक दौलत लोखंडे, अशोक आदक पाटील, उदय डोके, सतीश जाधव पाटील उपसरपंच महेंद्र पोखरकर, उद्योजक संदीप पोखरकर, रामदास जाधव, मुख्याध्यापक संभाजी लोखंडे उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले या भागातील शेतकर्यांनी पुनर्वसनाच्या शिक्के काढण्याबाबत प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे या संदर्भात यापूर्वीच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे जुन्नर तालुक्यातील गुलाब नेहरकरांच्या गावात तसेच शिरूर तालुक्यातील तीन हजार एकर वरील एमआयडीसीचे शिक्के काढण्यात आले आहे याबाबत पोंदेवाडी परिसरातून तसा प्रयत्न झाला नाही तो व्हायला हवा होता त्यामुळे ती अडचण सोडविण्यासाठी भविष्यात अनिल वाळुंज यांनी बाकीच्या विकास कामाव्यतिरिक्त हे शिक्के काढण्यासाठी पुढाकार घ्यावा माझ्या वतीने सर्वोतपरी सहकार्य केले जाईल. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.

दिलीप वळसे पाटील यांनी या गावातील शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात आमदार नसतानाही ३३ वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नाची आठवण सांगितली त्यांनी सांगितले ८८-८९ साली मी आमदारही नव्हतो तरीही शेतकर्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव देशमुख यांना घेऊन पोंदेवाडी आलो होतो त्यावेळी शेतकर्यांच्या तक्रारी होत्या तलाठी, सर्कल पैसे घेतात यावर जिल्हाधिकारी म्हणाले मी बॅगेत पैसे घेऊन आलो आहे कोणी कोणी पैसे दिले सांगा त्यावेळी एकही जण पुढे आला नाही असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com