
पुणे : दहावीचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरीही पालकांना आतापासूनच अकरावीच्या प्रवेशाची चिंता सतावू लागलीयं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असावी की नसावी, प्रवेश कसे होतील, असे नानाविध प्रश्न पालकांच्या मनात घर करू लागलेत. पण, यावर अखिल भारतीय शिक्षक महासंघाने "अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेऐवजी महाविद्यालयस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवावी' असा पर्याय सूचविला आहे.
महासंघाचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार,
या कारणांमुळे "नको' केंद्रीय प्रवेश प्रक्रिया :
- या प्रवेश प्रक्रियेमुळे गुणवत्ता असूनही पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही.
- द्विलक्षी, व्यावसायिक अभ्यासक्रम, विज्ञान (जनरल) या शाखांमधील 20 टक्क्यांहुन अधिक जागा राहतात रिक्त.
- ही प्रवेश प्रक्रिया साधारणत: तीन महिने तरी चालतेच.
- अनेक पात्र व इच्छुक विद्यार्थी प्रवेशापासून राहतात वंचित
- विद्यार्थ्यांना दुरची महाविद्यालये मिळाल्याने प्रवासातच अधिक वेळ जातो. (आणि आताच्या दिवसांत विद्यार्थ्यांचा नाहक होणारा प्रवास टाळलेला बरा)
- प्रवेशात येणाऱ्या अडचणींमुळे पालकांची उपसंचालक आणि शिक्षण संचालक कार्यालयात सतत होते गर्दी
महासंघाने दिलेले पर्याय..
- दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात द्विलक्षी तसेच व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सुरू करावेत. त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार व प्रवेश नियमावलीनुसार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवावी.
- नियमित अकरावीचे (कला, वाणिज्य आणि विज्ञान) प्रवेश दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालय स्तरावर सुरू करावेत.
- महाविद्यालयांनी सर्व विषयांची माहिती, प्रवेश क्षमता शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
- विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीनुसार संबंधित महाविद्यालय आणि विषयासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा.
- महाविद्यालयांनी स्वतंत्रपणे गुणवत्ता यादी जाहीर करावी
- प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन दिवसांची मुदत द्यावी आणि हे प्रवेश तिसऱ्या आठवड्यात निश्चित करावेत.
- त्यानंतर शिल्लक जागांसाठीचे प्रवेश शिक्षण विभागाच्या नियमानुसार करावेत.
महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबविल्यास हे फायदे होतील :
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक आणि उपसंचालक कार्यालयात होणारी गर्दी टाळणे शक्य
- पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी विविध महाविद्यालयांमध्ये विभागली जाईल
- पसंतीनुसार महाविद्यालय निवडताना तेथील विषयांची माहिती विद्यार्थ्यांना थेट मिळेल.
- महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, पालक आणि विद्यार्थी यांचे समुपदेशनाचे काम सुटसुटीत होईल
- क्षमतेनुसार प्रवेश निश्चित होतील आणि रिक्त जागांचा धोका कमी होईल.
- दहावीच्या निकालानंतर साधारणत: एका महिन्यात अकरावीचे वर्ग सुरू करणे शक्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.