Vidhan Sabha 2019 :...अन्यथा राजकारण सोडून देईन : अश्विनी कदम

else I will quit politics says Ashwini Kadam
else I will quit politics says Ashwini Kadam

सहकारनगर (पुणे) : पर्वतीत निष्क्रिय आमदारांमुळे पर्वती मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. गेल्या दहा वर्षात व पाच वर्ष सत्ता असतानाही मतदार संघातील अनेक प्रलंबित आहेत, परंतु मी आमदार नसताना देखील नागरिकांची अनेक कामे मार्गी लावली असून जनतेने पर्वती मतदार संघातील प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास गेल्या दहा वर्षात जे झाले नाही ते पाच वर्षात करून दाखवेन अन्यथा राजकारण सोडून देईन अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी दिली.

मतदारसंघातील आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मतदारसंघातील प्रत्येक विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार अश्विनी कदम यांनी पदयात्रा व कोपरा सभा आणि नागरिकांनी थेट संपर्क साधत असल्याने नागरिक सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहेत. यावेळी नागरिक 'ताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशी जोरदार घोषणा देत नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

मनसेचा आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठींबा

अश्विनी कदम म्हणाल्या, माझ्या वार्डमध्ये  गेल्या पंधरा वर्षात सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत नगरसेवक आहे त्यावेळी पासून विकास कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे.तसेच या विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावले असून भविष्यात विकास करण्यासाठी नेहमी प्राधान्य असेल.

पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांना वाढता पाठिंबा

पर्वती भागात आजही अनेक समस्या आहेत पण या आमदारांना यायला वेळ नाही कारण त्यांच्या मागे दुसरा खूप मोठा व्याप आहे. त्यामुळे आमदार असून सुद्धा त्या लोकांच्या समस्या सोडवू शकत नसल्याने त्यांना यावेळी जनतेने घरी बसायचे ठरवले आहे.जनतेचा आशीर्वादाने मी आमदार झाल्यावर पर्वतीचा विकास झपाट्याने होईल यात काही शंका नाही असेही अश्विनी कदम यांनी सांगितले.यावेळी नागरिकांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत यावेळी आम्ही पर्वतीत परिवर्तन करण्याचा निश्चय केला असून यंदा परिवर्तन घडेल असा निर्धार नागरिकांनी केला.

पर्वती कोणाची वहिनींची की ताईंची ?

विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्वती मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम पर्वती मतदारसंघ पिंजून काढत आहेत.गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये अश्विनी कदम व  नितीन कदम व त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते मतदारसंघांमध्ये पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार करीत आहेत. याबरोबर विविध समाजाचे मेळावे, मंदिरे आणि ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत त्या त्या भागातील नागरिकांची संवाद साधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com