मळद-रावणगाव येथे रस्ता अडविल्याने शेतकर्‍यांची गैरसोय

मळद-रावणगाव येथे रस्ता अडविल्याने शेतकर्‍यांची गैरसोय

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील मळद येथे शेतकर्‍यांना खडकवासला कालव्यावरून दळणवळणासाठी पाटबंधारे विभागाने पूल बांधला आहे. मात्र कोणताही संबंध नसताना एकाने पुलाच्या पुढील रस्ता बळजबरीने बंद केल्याने परिसरातील इतर शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्ता प्रशासनाने खुला करावा अशी मागणी होत आहे.

पिढीत शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मळद-रावणगाव शिवेवर असलेल्या गट क्रमांक 271 मधून खडकवासला कालवा गेला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे दोन भाग झाले आहेत. यासंदर्भातील कागदपत्रे व नकाशे उपलब्ध आहेत. याच ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पूल बांधला आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांचे दळणवळण चालू होते. मात्र काही दिवसांपूर्वी एकाने कोणताही संबंध नसताना अचानक पुलाच्या पुढील रस्ता बळजबरी, आडमुठेपणाने बंद केला आहे.

याबाबत विचारणा केली असता राजकीय पाठबळामुळे संबंधित व्यक्तींकडून आरेरावीची भाषा वापरली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. रस्ता बंद केल्याने परिसरातील शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक व येजा करण्याची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुहास साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले अनेक वर्षांपासून दळणवळण  चालू असलेला रस्ता बंद करणे चुकीचे आहे. रस्ता खुला करण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींना सांगितल्याची माहिती साळुंके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com