

Harshvardhan Patil
sakal
पुणे: ‘‘केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याने देशातील साखर उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे. अगोदरच निर्यातीसाठी करार केलेल्या कारखान्यांवर मोठी आर्थिक गुंतागुंत निर्माण झाली असून, बंदरांकडे रवाना झालेले कंटेनर आणि आगाऊ रक्कम स्वीकारलेल्या निर्यात व्यवहारांमुळे उद्योग अडचणीत आला आहे. अशा निर्णयांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूरगामी परिणाम होऊ शकतात,’’ असा इशारा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिला.