

Leopard fear grips rural Maharashtra; families refuse marriage proposals in affected villages amid rising panic.
Sakal
-संजय बारहाते
टाकळी हाजी: बिबट्यांच्या मानसांवरील वाढत्या हल्याने बिबटप्रवण क्षेत्रातील गावांतील मुलांच्या सोईरिक जमणेही अवघड झाल्याने वर पित्यांपुढे नवीन संकट उभ राहु पहात आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील चासकमान आणि कुकडी प्रकल्पामुळे या भागात शेतीला पाणी मिळालं, आणि गावागावात बागायत फुलले. एकेकाळी उजाड असणाऱ्या माळरानावर आता ऊस, डाळिंब, कांदा, भाजीपाला अशी समृद्ध पिकं दिसू लागली. झोपड्यांच्या जागी बंगले उभे राहिले, सायकलच्या जागी चारचाकी वाहनं उभी राहू लागली. पैसा, ऐश्वर्य, आणि शहरी झळाळी गावाकडे आली. पण या समृद्धीच्या सावलीत आता भयाने घर केले आहे. ते बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचं भय.