पुणे : भाजप संविधान बदलणार आहे, असा बिनबुडाचा आरोप करणाऱ्यांनी यापूर्वी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक ७५ वेळा घटना दुरुस्ती झाल्या आहेत, ही बाब विसरू नये. त्यांनीच संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे शब्द समाविष्ट करून थेट घटनेच्या मूळ चौकटीलाच धक्का लावला आहे,'' असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केला.
भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे नेते श्याम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, प्रचार व प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
भाजपवर संविधान बदलण्याबाबत होत असलेल्या आरोपांबाबत भांडारी म्हणाले, ""संविधान बदलायचे असते, तर भाजपला ४०० जागांची गरज नव्हती, यापूर्वी बहुमत मिळाले ते संविधान दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरले असते. राज्य घटनेला आता ७५ वर्षे पूर्ण होतील.
आत्तापर्यंत १०५ वेळा घटना दुरुस्ती झाली आहे, त्यामध्ये कॉंग्रेस सरकार सत्तेत असतानाच ७५ वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. तर ७५ पैकी ५६ वेळा घटना दुरुस्ती ही गांधी - नेहरू कुटुंबाने केली आहे. इंदिरा गांधी यांनी ४२ वी घटनादुरुस्ती करून आणीबाणी लादत नागरिकांचे हक्क हिरावून घेतले. कॉंग्रेसनेच राज्यघटनेची मोडतोड केली आहे. मात्र, भाजप संविधानाच्या मूळ चौकटीला कधीही धक्का लावणार नाही.''
पण समाजवाद शब्दावर चर्चा व्हायलाच हवी !
इंदिरा गांधी यांनी ४३ व्या घटना दुरुस्तीच्यावेळी राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे शब्द समाविष्ट केले आहेत. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्षता शब्दाबाबत आम्हाला काही अडचण नाही, मात्र समाजवाद या शब्दाबाबत चर्चा झाली पाहिजे, असे भांडारी यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.