Monsoon : मॉन्सूनने देशाच्या बहुतांश भागातून निरोप घेतला

मॉन्सूनच्या वाऱ्यांनी परतीच्या प्रवासात मोठी मजल मारत देशाच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे.
monsoon
monsoonsakal

पुणे - मॉन्सूनच्या वाऱ्यांनी परतीच्या प्रवासात मोठी मजल मारत देशाच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. १३) कोकणातील काही भाग वगळता उर्वरित राज्यातून मॉन्सून बाहेर पडला आहे. दरम्यान मॉन्सून लवकरच संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

परतीच्या प्रवासाला २५ सप्टेंबर रोजी सुरवात करणाऱ्या मॉन्सूनने सोमवारी (ता. ९) कोकण व विदर्भाच्या काही भागाला वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. त्यानंतर मात्र मॉन्सूनची सीमा काही दिवस तशीच कायम होती. परंतु आता मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरवात करत शुक्रवारी (ता. १३) देशाच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे. त्यामुळे सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा ही मालदा, विशाखापट्टण, नालगोंडा, रायचूर ते वेंगुर्लापर्यंत आहे.

सध्या दक्षिण व ईशान्य भारतातील काही भाग सोडला तर देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतला आहे. संपूर्ण झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील काही भागातून तसेच तेलंगणाच्या बऱ्याच भागातून मॉन्सून परतला आहे. दरम्यान मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असून पूर्ण देशातून मॉन्सून लवकरच बाहेर पडेल असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com