Raju Shetti : मोदींचे अनेक निर्णय लोकशाही व देशासाठी घातक

'मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे असून देश व लोकशाहीला घातक ठरणारे आहेत.
Raju Shetti
Raju ShettiSakal

औंध - 'मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे असून देश व लोकशाहीला घातक ठरणारे आहेत. एकीकडे शेतकरी,गोरगरीब कामगारांची पिळवणूक होत असताना हे सरकार उद्योगपती धार्जिण्या पद्धतीने काम करत आहे." अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

सूसगाव येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हि टिका केली. याप्रसंगी अमरसिंह कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, बाप्पूसाहेब कारंडे, ॲड. योगेश पांडे, सुदिन खोत, दिलीप बालवडकर, नारायण चांदेरे, चंद्रकांत पाटील, अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे, अमित कुडले, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'हे सरकार शेतकरी, कष्टकरी यांच्या विरोधातील असून उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली. परंतु शेतकऱ्यांची छोटीशी कर्जे माफ करण्यासाठी व नवीन योजना आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मात्र कुचकामी ठरलेले आहे. असेही शेट्टी म्हणाले. सरकारी क्षेत्रातील वाढते खाजगीकरण, वाढती महागाई यावरही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

तर सध्याच्या चर्चेत असलेल्या निवडणूक रोख्यांबद्दल (इलेक्टोरल बॉन्ड) बोलताना ते म्हणाले, 'शेतक-यांची मुले आणि शेतकरी हेच माझे इलेक्ट्रॅाल बाँड असून त्यामुळेच मी आजही लोकवर्गणीतूनच निवडणूक लढवतोय'. यावेळी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या व मुळच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com