गरिबी हटवण्यासाठी नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञानं सुचवला पर्याय

Abhijit_Banerjee
Abhijit_Banerjee

पुणे : "गरीब व्यक्तींकडे क्षमतेचा अभाव असल्याने ते जोखमी उचलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा वित्तपुरवठा प्रतिबंधत होतो. यातून सुटका करण्यासाठी अशा समाजासाठी क्षमता विकास व्हावा म्हणून सामाजिक दृष्टीकोनातून धोरण राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्राचे नोबेल विजेते डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी केले.

गोखले अर्थ व राज्यशास्त्र संस्थेच्या ऑनलाइन पदवी प्रदान समारंभनिमित्ताने काळे स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. बॅनर्जी यांनी सद्यस्थितीच्या द्रारिद्र्याचे द्रुकश्राव्य माध्यमातून विश्लेषण केले. प्रभारी संचालक डॉ. राजस परचुरे उपस्थित होते. या समारंभात १६२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आणि ४ विद्यार्थ्यांना पीएचडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. बॅनर्जी यांच्या हस्ते गोखले अर्थ व राज्यशास्त्र संस्थेतील नूतणीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन झाले. 

डॉ. बॅनर्जी म्हणाले, "गरीब  हे कमी जोखमीचे काम करतात. त्यामुळे ते गरीबच राहतात. द्रारिद्र्याच्या जाळ्यात अडकणाऱ्या व्यक्तींसाठी पतपुरवठा प्रतिबंधित असतो. नैसर्गिकदृष्ट्या प्रतिकूल परिणाम होतो, तर दर्जात्मक पाठबळ  त्यांना मिळत नाही. गरीब व्यक्तींना सक्षम करण्यासाठी सामाजिक दृष्टीतून धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. या धोरणात दिर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असावा, असे ही  डॉ. बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. डॉ. राजस परचुरे यांनी प्रास्ताविक केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com