'आत्ता फक्त मोदी सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा जाळला, भविष्यात कांद्याने सडकून काढू'

'आत्ता फक्त मोदी सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा जाळला, भविष्यात कांद्याने सडकून काढू'

मंचर  : कांदा निर्यात बंदीचा निर्णया मागे घेऊन कांदा निर्यात पुन्हा सुरू करावी. आज फक्त मोदी सरकारमधील मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे, भविष्यात केंद्रीय मंत्र्यांना कांद्याने सडकून काढल्याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याचे तीव्र पडसाद आंबेगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटले आहेत. संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १७) मंचर (ता. आंबेगाव) येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

दरम्यान, बांगर यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बांगर म्हणाले “केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. कोरोनाची साथ, लॉकडाउन यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. काही उद्योगपती व राष्ट्रीयकृत बँकांना मोदी सरकार सढळ हाताने मदत करत आहे. पाकीस्तान सारख्या शत्रू राष्ट्रातून कांद्याची आयात करून भारतीय शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडले जातात. हेसर्व चुकीचे सुरु आहे.'' 

यावेळी वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, पंकज पोखरकर, राहुल बांगर, हरिदास बांगर, नवनाथ बांगर, सचिन रामाने, विराज थिटे, ऋषिकेश सूर्वे, लहू गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com