
पुणे आणि मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम मुंबई लोकल सेवेसह पुणे-मुंबई रेल्वेसेवेवरही झाला आहे. दरम्यान मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबईदरम्यानच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.