Pune News : अखेर भामा आसखेड धरण भरले,शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त...

येवा कमी असल्याने सध्या तरी विसर्ग नाही
bhama aaskhed
bhama aaskhed sakal

आंबेठाण - गणपती उत्सव निम्मा होत आला तेव्हा कुठे तरी भामा आसखेड धरण (ता. खेड ) भरल्याने शेतकऱ्यांसह या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.सध्या भामा आसखेड धरण १०० टक्के भरले आहे. परंतु पाऊस कमी असल्याने धरणात येवा कमी आहे परिणामी सध्या तरी धरणातून विसर्ग सोडण्यात आला नाही. मागील वर्षी धरणातून १० ऑगस्टला पहिला विसर्ग सोडण्यात आला होता यावरून पाऊस किती कमी आहे ? हे लक्षात येते.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९९.२३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या तुलनेत या वर्षी भामा आसखेड धरण खूप उशिरा भरले आहे.

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ६५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर मागील वर्षी आजच्या तारखेला धरण परिसरात ११४६ मिमी पाऊस पडला होता.यावरून पाऊस किती कमी पडला आहे याचा अंदाज येतो.

bhama aaskhed
Ahmednagar : एकलहरे शिवारात दरोडा,गळा आवळून खून,रोख सात लाखांसह दागिने लांबविले

धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ८.१४ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा ७.६७ टीएमसी इतका आहे.मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

मागील वर्षीपासून भामा आसखेड धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच प्रचंड कडक असणाऱ्या उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता.त्यामुळे यावर्षी धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

bhama aaskhed
Pune News : महाज्योतीच्या प्रशिक्षण परीक्षा ऑक्टोंबरमध्ये

पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराला देखील पाणी पुरवठा सुरू झाला तर धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात शिल्लक राहणार आहे.

भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत राबविले जाणारे उजवा आणि डावा कालवा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात भामा आसखेड धरणाचे पाणी पूर्णपणे पिण्यासाठी राखीव केले जाईल अशी शक्यता आहे.पाऊस कमीच राहिला आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा सुरू झाला तर नदीपात्रात केला जाणारा विसर्ग देखील कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे भरण्यावर देखील याचा परिणाम होणार आहे.

bhama aaskhed
Pune : चांदणी चौकातील सुधारणेसाठी मोजावे लागणार २५ कोटी

धरण जरी शंभर टक्के भरले असले तरी धरण क्षेत्रात सध्या पाऊस कमी आहे. त्यामुळे येवा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या तरी विसर्ग सोडला जाणार नसून पुढील काळात पावसाचे प्रमाण पाहता विसर्ग सोडण्याबाबत निर्णय होईल.त्यामुळे भविष्यात पाणी जपून वापरावे लागेल असे आवाहन सहाय्यक अभियंता ( श्रेणी १ ) अश्विन पवार,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख,कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

सद्या धरण क्षेत्रात किरकोळ पाऊस होत आहे त्यामुळे शिवे,वहागाव,देशमुखवाडी,आंबोली,वांद्रा,कोळीये, आंभु,पाईट,पाळू,वाघू,तोरणे,आहिरे आदी भागातून धरणात थोडाथोडा पाणीसाठा जमा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com