Kundmala Bridge Collapse : कुंडमळा दुर्घटनेनंतर राज ठाकरेंकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, पर्यटकांनाही सुनावलं

Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse : एखादी दुर्घटना घडली की सरकारकडून बचावकार्य वेगानं सुरुय आणि बाधित नागरिकांच्या पाठिशी आहोत ही एकच प्रतिक्रिया असते असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केलीय.
Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse
Raj Thackeray On Kundmala Bridge CollapseEsakal
Updated on

मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिलीय. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणी प्रवेशबंदी का केली नाही? नवा पूल का बांधला नाही? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक घटनेनंतर सरकारमधल्या लोकांची एकच प्रतिक्रिया असते की बचावकार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

Raj Thackeray On Kundmala Bridge Collapse
Kundmala Bridge Collapse : नव्या पुलासाठी निधी आला, कामाचा आदेश निघताच ५ दिवसात जुना पूल कोसळला; चौघांचा मृत्यू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com