

Sugar Scam Raju Shetti Alleges 48 Lakh Tonnes Missing Demands Rs 5000 Per Tonne Payment To Sugarcane Farmers In India
sakal
नारायणगाव : ‘‘सरकारी हिशोबानुसार ३० ऑगस्टपर्यंत देशात ८३ लाख टन साखर शिल्लक राहणे आवश्यक होते. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशात ३५ लाख टन साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गायब झालेल्या सुमारे ४८ लाख टन साखरेच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांचा महागैरव्यवहार झाला आहे,’’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.