
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या धोकादायक गावातील आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. आदिवासी भागातील नागरिकांना स्वयंरोजगार शेतातच उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. पर्यटनाला वाव देण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.