गावपातळीवर शिवसेना पक्ष बळकट करा : आढळराव पाटील

गावपातळीवर शिवसेना पक्ष बळकट करा : आढळराव पाटील

तळेगाव ढमढेरे : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ग्राम पातळीवर जाऊन, पक्षाचे धोरण व मुख्यमंत्र्यांनी केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून ग्रामीण भागात शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शिवसेना आढावा बैठकीत शनिवारी श्री आढळराव पाटील बोलत होते.

आढळराव पुढे म्हणाले, ''शिवसेना ही सर्वसामान्यांची 
ताकद आहे. शिवसेनेत गद्दारांना स्थान नाही. पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. शिवसैनिकांनी तळागाळापर्यंत जाऊन, पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोचवावीत. ग्रामपातळीवरील निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे. शेतकरी व कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देऊन, वेळ पडली तर आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सर्व मतदार संघाचा आढावा घेऊन दौऱ्याचा अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी आढळराव यांनी सांगितले. बैलगाडा शर्यती सुरु होण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन लोकसभा गाजवली, शर्यतीला राज्यभर प्रसिद्धी देण्याचे कार्य आपण केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रमुख माउली कटके, युवासेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, डॉ. सुभाष पोकळे, तालुका प्रमुख सुधीर फराटे व गणेश जामदार आदींची भाषणे झाली. यावेळी अरुण गिरे, सुरेश भोर, अनिल काशिद, पोपट शेलार, राम गावडे, संजय देशमुख, नितीन नरवडे, रोहिदास खेडकर, गणेश शिंदे व शिरूर - आंबेगाव मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com