वेळ कमी, कसा होणार अभ्यास? दहावी- बारावीच्या परिक्षांसाठी शिक्षकांसमोर आव्हान

students preparation challenge for teachers less time left for Class X-XII exams
students preparation challenge for teachers less time left for Class X-XII exams

पुणे : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झाले असले, तरीही उरलेल्या दिवसांमध्ये आणि कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांची आणि विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचे आव्हान सध्या शिक्षकांसमोर उभे ठाकले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. परंतु तरीही शाळा सुरू झाल्यापासून ऑनलाइन शिकविलेल्या अभ्यासाची पुन्हा उजळणी करून घेतली जात आहे. उर्वरित अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्यासाठी ओढाताण करावी लागत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरू असलेले शिक्षण आता थांबले असून, आता राज्यातील लाखो विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात बसून, पूर्वीप्रमाणे शिक्षण घेत आहेत.

'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO

शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हजेरीने गजबजल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार, सध्या शाळा तीन ते चार तासच भरविल्या जात आहेत. त्यामुळे या कालावधीत अभ्यासक्रमानुसार तासिकांचे नियोजन करत, प्रत्यक्ष वर्गात शिकविताना शिक्षकांची पुरती दमछाक होत आहे. राजगुरुनगर येथील वसंतराव मांजरे विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णूपंत मेदगे म्हणाले, ‘‘दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ असल्याने अभ्यासक्रम वेगाने शिकवून पूर्ण करावा लागत आहे. त्यात सराव परीक्षांचे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची, असा मोठा प्रश्न आहे. अंतर्गत मूल्यमापन द्यायचे की अभ्यासक्रम संपवायचा हा ताण अध्यापकांवर आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.


''प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या तरीही विद्यार्थ्यांची पहिल्यापासून उजळणी घ्यावी लागत आहे. तसेच वर्षभरातील ‘प्रॅक्टिकल’ एक-दीड महिन्यात पूर्ण करायचे आहे. असे असतानाच राज्य सरकारच्या आदेशानुसार तासिकांचा वेळ मर्यादित ठेवावा लागत आहे. उपलब्ध वेळेत अभ्यास शिकवून पूर्ण होत नाही. त्यामुळे शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांची उजळणी वेळेत पूर्ण व्हावी म्हणून जोमाने कामाला लागले आहेत. तासिका कमी पडत असल्याने काही शिक्षक रविवारी शाळा भरवत आहेत.''
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

''एका वर्गात १५ ते २० विद्यार्थी अशी आसन व्यवस्था केल्याने विद्यार्थी दिवसाआड शाळेत येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात सातत्य टिकत नसल्याचे दिसते. ऑनलाइन शिक्षणातून ७५ टक्के विद्यार्थ्यांना शिकविलेला अभ्यासक्रम नीटसा कळलेला नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा सगळा अभ्यासक्रम शिकवायचा का, की उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करायचा, अभ्यासाची उजळणी करून घ्यायची, अशा पेचात शिक्षक आहेत.''
- तुकाराम शिरसाट, प्राचार्य, आर. जी. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, मुखई, ता. शिरूर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिकवताना येणाऱ्या अडचणी
- ऑनलाइन शिक्षणात न कळलेल्या अभ्यासाचा अधिक सराव
- उपलब्ध वेळेत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करावा लागणार
- दिवसाआड शाळा असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य राहत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com