यंदा जेईई ऍडव्हान्सचे दोन्ही पेपर अवघड; कटऑफ येणार खाली!

JEE_Exam
JEE_Exam

पुणे : भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी -आयआयटी) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी-एनआयटी) या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेली "जेईई ऍडव्हान्स' ही प्रवेश परीक्षा पुण्यासह देशभरात पार पडली. मात्र, यंदा दोन्ही सत्रातील पेपर अवघड आल्याने आयआयटी आणि एनआयटीच्या प्रवेशासाठी कटऑफ 150 ते 180 गुणांदरम्यान असणार आहे.

दिल्ली आयआयटीतर्फे राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेचे आयोजन केले जाते. रविवारी (ता. 27) देशभरात 222 ठिकाणीही परीक्षा पार पडली. देशभरातून सुमारे 1 लाख 60 हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते, पुणे येथील केंद्रावर पुणे व परिसरातील जिल्ह्यांमधील सुमारे 2 हजार 500 जणांनी परीक्षा दिली. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 आणि दुसरा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळात पार पडला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत ही परीक्षा घेण्यात आली.

आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, "जेईई ऍडव्हान्सचे दोन्ही पेपर गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अवघड आले होते. यापूर्वी 2016 मध्ये असे अवघड प्रश्‍न विचारले गेले होते. ऍडव्हास परीक्षेत 396 गुणांसाठी एकूण 108 प्रश्‍न विचारले जातात. यंदा 108 पैकी जवळपास 90 प्रश्‍न अवघड विचारले गेले आहेत. त्यामुळे आयआयटी प्रवेशासाठी 150 ते 180 मध्ये कटऑफ येण्याची शक्‍यता आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सहा महिने जास्त मिळाले असल्याने कदाचित काठिण्य पातळीत वाढ झाली असावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com