
परिंचे, १८ : वीर (ता.पुरंदर) धरणाची पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या धरणात ५२ टक्के पाणी साठा झाला असून, गेल्या आठवड्याभरात धरणात दहा टक्के पाणीसाठा वाढला आहे.
नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीसाठा १९.५१ टक्के म्हणजे ९.६५ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे शाखा अभियंता स्वरूपा माळी व लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले आहे. धरणात बुधवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या आकडेवारी नुसार ५२ टक्के म्हणजे ४.९३ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरणात ८.४० टक्के म्हणजे १.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नीरा देवघर धरणात १२.८३ टक्के पाणीसाठा म्हणजे १.५० टीएमसी झाला आहे. गुंजवणी धरणात २७.५७ टक्के पाणीसाठा म्हणजे एक टीएमसी पाणी साठा झाला आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून ओढ्या नाल्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे वीर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच कालवे फुटण्याच्या घटना घडल्यामुळे वीर धरणाचा उजवा व डावा कालवा बंद ठेवण्यात आला आहे.
धरणात समाधानकारक पाणीसाठा
नीरा प्रणाली मध्ये येणाऱ्या चार धरणांची गेल्या वर्षीची या दिवसाची आकडेवारी पाहिली असता ९.६५ टक्के पाणी साठा म्हणजे ४.६७ टीएमसी पाणी साठा झाला होता.चालु वर्षी या चार धरणांमध्ये १९.५१ टक्के म्हणजे ९.६५ टीएमसी पाणी साठा झाला आहे. नीरा नदीच्या धरण साखळी क्षेत्रातील गेल्या वर्षाची आकडेवारी पाहिल्यास या वर्षी धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे पाहायला मिळत आहे.
02661
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.