मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र वचननामा का? यावर भाजप-शिवसेना दोघेही एकत्र काम करणार आहोत. जाहीरनामे वेगळे असले तरी, त्यांच्याकडील काही चांगले मुद्दे असतील, तर तेही आम्ही स्वीकारू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जे वचन देतो ते पूर्ण करतो
ठाकरे म्हणाले, 'शिवसेना वचन देते ते पूर्ण करते. भाजप-शिवसेना आम्ही दोघेही एक आहोत. या निवडणुकीनंतर एकही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही, याची मी ग्वाही देतो. हा वचननामा तयार करताना, राज्याच्या तिजोरीवर किती भार पडले, याचाही विचार करण्यात आला आहे. प्रमुख्याने अन्न आणि आरोग्य चाचणी या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे.'
आरे जंगलाचा उल्लेख नाही
मुंबईतील आरे कॉलनीतील जंगल वाचवण्या संदर्भात वचननाम्यात उल्लेख नसल्याबद्दल ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'आरेचा विषय मुंबई पुरता आहे. आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्राचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत तर, पुढे प्रत्येक विभागानुसार जाहीरनामा देणार आहे. त्यात मुंबईचा वेगळा, मराठवाड्याचा वेगळा, विदर्भाचा वेगळा असेल. त्यात स्थानिक मुद्द्यांचा समावेश असणार आहे.' त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'आरे विषय मुंबईकरांचा आणि सर्व राजकीय पक्षांचा आहे. सर्वांनी या विषयावर आपली भूमिका जाहीर करावी. शिवसेनेने भूमिका जाहीर केली आहे. आम्ही विरोध केला यापुढेही करत राहू.'
काय आहे वचननाम्यामध्ये?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.