

Antyodaya Anna Yojana
ESakal
सरकार अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत (AAY) मिळणारी धान्याची निश्चित मर्यादा प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलोवरून कमी करून प्रति व्यक्ती प्रति महिना ७ किलो करण्याचा विचार करत आहे. या निर्णयामुळे मोठ्या गरीब कुटुंबांना फायदा होईल. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून, अन्न मंत्रालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६ वर १३ जुलैपर्यंत जनतेकडून अभिप्राय मागवले आहेत.