नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने शेअर बाजारात लागोपाठ दोन दिवसांत विक्रमी उच्चांक आणि नीचांक अशा परस्परविरोधी स्थिती दिसून आली. निकालानंतरच्या नव्या पर्वात होणाऱ्या राजकीय घडामोडींचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘विकसित भारता’च्या दिशेने प्रवास करताना, सध्याची राजकीय स्थिती, नवे सरकार, आपली सध्याची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यांचा एकत्रितपणे वेध घेणे योग्य ठरेल.