
सौरभ मुखर्जी यांनी इशारा दिला आहे की भारतातील मध्यमवर्गाकडील पैसा कमी होत आहे, त्यामुळे कंपन्यांची विक्री आणि नफा दोन्ही घसरला आहे.
पांढरपेशा नोकऱ्यांची वाढ थांबणे, वेतनात घट व एआय-ऑटोमेशनचा प्रभाव ही संकटाची मुख्य कारणे आहेत.
घरगुती बचत 50 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली असून, यामुळे भारताच्या विकासाला धोका निर्माण होऊ शकतो.
Middle Class: भारतातील मध्यमवर्ग (Middle Class) सध्या आर्थिक तणावाखाली असल्याचा गंभीर इशारा मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे सौरभ मुखर्जी यांनी दिला आहे. त्यांच्या ब्लॉगनुसार, दिवाळी 2023 पासून भारतीय कंपन्यांच्या इन्कम ग्रोथमध्ये मोठी घसरण झाली असून त्यामागे मध्यमवर्गीयांचा कमी झालेला खर्च हे प्रमुख कारण आहे. मुखर्जींच्या मते, “भारतीय मध्यमवर्गाकडील पैसा कमी होत असल्याने कंपन्यांची विक्री घटत आहे.”