Impact on India-Bangladesh Relations
Sakal
बांगलादेशातील वणवा आणि तेथे निर्माण झालेली अराजकसदृश स्थिती चिंताजनक आहे. अलीकडच्या काळातील एक मोठे राजनैतिक आव्हान त्यामुळे भारतापुढे तयार झाले असून, त्यातील पेच गुंतागुंतीचा असल्याने त्यावर सरळसोट असा तोडगा नाही. बांगलादेशाबरोबरची मैत्री टिकवायची, पण त्याचवेळी महम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या ‘छत्रछाये’खाली धुमाकूळ घालणाऱ्या भारतविरोधी शक्तींचा बंदोबस्त करायचा, ही एकप्रकारे तारेवरची कसरत आहे. त्यातही काळजीची बाब म्हणजे बांगलादेशात इस्लामिक पुनरुज्जीवनवादी गटांच्या कारवायांना ऊत आला आहे.