भारताची डोकेदुखी ही चीनला संधी वाटते, हे कधीच लपून राहिलेले नाही. सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय चीन स्वस्थ बसणार नाही.
पहलगाम हत्याकांडानंतर भारतद्वेषाने पछाडलेल्या पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवण्याची मागणी जोर धरते आहे. हा संताप स्वाभाविकच म्हटला पाहिजे. समाजाच्या आणि राष्ट्राच्या जिवंतपणाचेच ते लक्षण आहे, यात शंका नाही. मात्र हा धडा कसा शिकवायचा, याविषयी ज्या सूचना, मागण्या केल्या जात आहेत, त्यांना केवळ भावनोद्रेक म्हणता येईल.