

arvind kejariwal
ईडीने २०१४ पासून पाच हजार २०० हून अधिक खटले दाखल केले. त्यात आजतागायत दोनच खटल्यांत नेत्यांना शिक्षा होऊ शकली. तपासयंत्रणांचा वापर कशारीतीने होत आहे, याची कल्पना यावरून सहजच येते.
राजकारणात प्रतिस्पर्ध्यांना नमविण्यासाठी हाताशी असलेली सर्व अस्त्रे-शस्त्रे वापरली जातात. परंतु केवळ सत्तेमुळे लाभलेल्या साधनांचा वर्चस्व टिकविण्यासाठी अतिरेकी वापर व्हायला लागला की नीतिमूल्यांचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही.