swadeshi
sakal
भारतात गुणवत्तेची कमतरता नाही. पण अभाव आहे तो संस्थात्मक कोंदणाचा. ते निर्माण केले तर भारताची प्रगतिपथाकडील वाटचाल कोणी रोखू शकणार नाही.
स्वदेशी... या तीनअक्षरी मूलमंत्राने आपल्या देशाच्या अर्थ आणि राजकारणाचे अवघे अवकाश व्यापलेले दिसते. त्याची पाळेमुळे ही स्वातंत्र्यलढ्याच्या काळापर्यंत जातात. त्यावेळी ब्रिटिश राज्यकर्ते करीत असलेल्या अन्याय्य शोषणाच्या विरोधातील स्वदेशी हे एक अस्त्र होते. त्याला राजकीय आणि प्रतीकात्मक ‘अर्थ’ही होता.