Rohit Arya
sakal
ओलीसनाट्याच्या निमित्ताने इतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यावर मंथन व्हायला हवे, याचे कारण ते आपल्या एकूण व्यवस्थेशी संबंधित आहेत.
पुन्हा एकदा मुंबई हादरली. गेल्या अनेक वर्षांत मुंबईने कित्येक दहशतवादी हल्ले पचवले आहेत. अगदी २६-११च्या वेळी ‘हॉटेल ताज’मध्ये अडकलेले नागरिक आणि त्यांच्या सुटकेचे भयानक नाट्यही पाहिले आहे. मुंबईला वेठीस धरण्याच्याही अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत; पण गुरुवारी पवईत घडलेले नाट्य वेगळेच होते.