India-China Trade
sakal
चीनमधून तयार माल मागविण्यापेक्षा चीनचे तंत्रज्ञान आणि भांडवल वापरून भारतात उत्पादन करणे हे भारताच्या हिताचे आहे.
गलवान खोऱ्यातील २०२० मधील संघर्षानंतर भारत-चीनमधील गोठलेले आर्थिक संबंध आता बर्फ वितळावा तसे वितळू पाहात आहेत. केंद्र सरकारने नुकताच १० मार्चला घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. ज्या कंपन्यांमध्ये चीनची दहा टक्क्यांपर्यंत गुंतवणूक आहे, अशा कंपन्यांना आता भारतात थेट (ऑटोमेटेड) गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. हा केवळ एक कागदोपत्री बदल नाही.