अग्रलेख : बेजबाबदारीचेे खड्डे!

रस्ते व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जेवढा रस दाखवला जातो, तेवढाच तो नित्य देखभालीतही घेतला जावा, ही अपेक्षा आहे. विकासाचा खरा हमरस्ता तोच आहे. पण त्यासाठी व्यवस्थात्मक सुधारणांना पर्याय नाही.
India's Roads: Where Potholes are Permanent and Accountability is Absent.

India's Roads: Where Potholes are Permanent and Accountability is Absent.

Sakal

Updated on

अग्रलेख 

सार्वजनिक दळणवळण व्यवस्था ही देशाच्या अर्थकारणाची महत्त्वाची नाडी असते. रस्ते चांगले तर वाहतूक सुरळीत. पण हल्ली देशभरातील रस्त्यांची स्थिती पाहिली की खड्डे हीच आपल्याकडच्या रस्त्यांची ओळख बनली आहे की काय, असा प्रश्न मनात येतो. आर्थिक राजधानी बृहन्मुंबई असो की विद्येचे माहेरघर असलेले पुणे किंवा ‘आयटी’सीटी बंगळूर.. आपल्याकडे रस्त्यांमधील खड्डे चांद्रभूमीवरील खड्ड्यांप्रमाणे जणू चिरस्थायी आहेत. बरे ते बुजविले जाण्याचा प्रयोग केला जातो, तोच मुळी ते पुन्हा पडावेत यासाठीच! पावसाच्या एका सडाक्यातच डांबर, खडी अन् सिमेंट सगळे काही अदृश्य होऊन जाते. ग्रामीण भागांत वाड्या, वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था नित्याचीच; पण जिथे उद्योग, व्यवसायांची दाटी आहे, तिथेही तीच अवस्था निर्माण होणार असेल तर ‘स्मार्ट’ वगैरे शब्द शहरांसाठी वापरणेदेखील हास्यास्पद वाटते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com