

uddhav thackeray Eknath Shinde
शिवसेनेला आपले पूर्वीचे तेज प्राप्त करून घ्यायचे असेल तर समाजकारणाकडे पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लक्ष द्यावे लागेल.
‘पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी?’ या कविवर्य ग्रेस यांच्या ओळी शिवसेनेच्या संदर्भात आठवण्याचे खरे तर कारण नाही. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर पक्षातली फूट टाळण्यासाठी आपल्या शिवसैनिकांना, ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’ अशी साद घातली होती.