aatmnirbhar bharat
sakal
‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा खरा कस आता लागणार आहे. त्यात यश मिळवायचे तर जी एक उणीव सातत्याने समोर येत आहे, तिच्यावर मात करणे आवश्यक आहे. ती म्हणजे खासगी क्षेत्रातून होणाऱ्या गुंतवणुकीचे रखडलेपण.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याविषयी केला जाणारा आशावादाचा गजर एकीकडे आणि चिंताजनक परिस्थितीचे इशारे दुसरीकडे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक या विषयाबाबत गोंधळात पडले तर नवल नाही. त्यातच जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि त्याहीपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नित्यनेमाने प्रकट होत असलेली व्यापारयुद्धाची खुमखुमी यामुळे हे धुके आणखी गडद झाले.