
अशी कोणती स्थिती आली की ज्यामुळे पाणी डोक्यावरुन जाऊन धनकड यांना तात्काळ राजीनामा देण्याची वेळ आली हा प्रश्न अनुत्तरित आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उपराष्ट्रपती धनकड यांनी राजीनामा देणे हे मोठ्या राजकीय बदलांचे सूचन आहे का, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. प्रकृति अस्वास्थ्यामुळे आपण पदत्याग करीत असल्याचे धनकड यांनी सांगितले आहे. पण हेच खरे कारण असेल, असे मानणे कठीण आहे.