स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : आवराआवर.
राजाधिराज उधोजीमहाराज भराभर प्रवासाच्या ब्यागा भरत आहेत. ब्यागेत काय काय भरावे, हे न कळल्यामुळे चिडचिडले आहेत. ब्यागेचे झाकणही धड लागायला तयार नाही. शेवटी ते वैतागून कमरेवर हात ठेवून उभे राहतात. अब आगे…
उधोजीराजे : (कमरेवर हात ठेवून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीनं येऊन) मुजरा महाराज…कशापायी याद केलीत?