

“Rising leopard attacks prompt government review of compensation for affected families and farmers.
Sakal
कऱ्हाड: राज्यभरात बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यात होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू, तर १४५ जण गंभीर जखमी झाले. २६ हजार ९७९ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्या बदल्यात आत्तापर्यंत भरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख ५६ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली आहे. यापुढेही त्यासाठी विशेष तरतुदीसाठी हालचाली सुरू आहेत. पुणे, सातारा जिल्ह्यातही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.