

Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.
sakal
कास : कोयना जलाशयामध्ये गाळाची भर अधिक होऊ लागली असून, ही सुपीक गाळयुक्त माती शेतीला अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा गाळ काढून आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधिक बळ मिळेल. जमिनीची सुपीकता वाढेल. धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठ्यात वाढ होईल. त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.