

MVA Eyes Dissatisfied Mahayuti Leaders; Jayant Patil Calls for a Political Upset
sakal
सातारा: सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीकडे मतदारांची संख्या कागदावर कमी दिसत असली तरी महायुतीतील नाराजांना आम्ही आमच्याकडे वळविल्यास यश मिळणार आहे. सातारकरांनी, बाळासाहेब देसाई व लक्ष्मणराव पाटील यांच्या वारसांनी स्वाभिमानातून राजकारण केल्यास निकाल वेगळा लागेल. भाजप विरोधातील नाराजी दाखविण्याची ही एकमेव संधी आहे, तसेच दोन्ही राजेंच्या विचाराने त्यांची उमेदवारी झाली नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सातारकरांनी या निवडणुकीत स्वाभिमान दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज येथे केले.