Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

MVA banking on dissatisfied Mahayuti leaders: महाविकास आघाडीचा उमेदवार अभयसिंह जगताप यांना महायुतीतील नाराजांची साथ मिळाल्यास सांगली-सातारा विधान परिषदेचा निकाल बदलू शकतो, स्वाभिमानातून मतदानाचे आवाहन
MVA Eyes Dissatisfied Mahayuti Leaders; Jayant Patil Calls for a Political Upset

MVA Eyes Dissatisfied Mahayuti Leaders; Jayant Patil Calls for a Political Upset

sakal

Updated on

सातारा: सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीकडे मतदारांची संख्या कागदावर कमी दिसत असली तरी महायुतीतील नाराजांना आम्ही आमच्याकडे वळविल्‍यास यश मिळणार आहे. सातारकरांनी, बाळासाहेब देसाई व लक्ष्मणराव पाटील यांच्या वारसांनी स्वाभिमानातून राजकारण केल्यास निकाल वेगळा लागेल. भाजप विरोधातील नाराजी दाखविण्याची ही एकमेव संधी आहे, तसेच दोन्ही राजेंच्या विचाराने त्यांची उमेदवारी झाली नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सातारकरांनी या निवडणुकीत स्वाभिमान दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज येथे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com