

Mega Infrastructure Boost: Green Corridor Project Accelerates Development Across Maan Desh
sakal
-उमेश बांबरे
सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे माण, खटाव आणि फलटण हे तालुके आता विकासाच्या महामार्गावर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. केंद्र सरकारचा ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ आणि राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ महामार्ग’ हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या भागातून जात असल्याने या तालुक्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. कधीकाळी रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या या मातीला आता सोन्याचे दिवस येणार असून, हे तालुके जागतिक नकाशावर ठळकपणे उमटणार आहेत.