गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

कऱ्हाड (जि. सातारा) ः गोळेश्वरला झालेल्या 24 तास पाणी योजनांचा लाभ घेणाऱ्या तेथील मिळकतधारकांचे पाणी कनेक्‍शन बंद करण्याचा ठराव येथील पालिकेच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार तेथील 30 लोकांना नोटिसा बजावून पाणी कनेक्‍शन बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

पालिकेतर्फे शहरालगतच्या गोळेश्वर गावातील 200 नागरिकांनी पाणी दिले जाते. गोळेश्वरला मागील काही दिवसांत 24 तास पाणी योजना झाली. त्यामुळे हळूहळू गोळेश्वरच्या भागातील नागरिकांनी पाणी 24 तास योजनेतून घेण्यास सुरवात केली. त्यामुळे उरलेले काही मोजकेच नागरिक कऱ्हाडचे पाणी घेत होते.

पाणी देणे व्यवहारिकदृष्टीने पालिकेलाही ते परवडत नव्हते. त्यामुळे त्यांचे पाणी बंद करण्याचा निर्णय पालिकेत घेण्यात आला. त्याचा ठरावही घेण्यात आला. त्या ठरावाव्दारे त्या भागातील नागरिकांचे पाणी कनेक्‍शन बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. गोळेश्वरमधील लोकांना पाणी देणे पालिकेला व्यवहारिकदृष्ट्या परवडत नसल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com