

Ajit Dada Remembered Across Parties at Satara Condolence Meet
Sakal
सातारा: राज्याच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. पक्ष, विचार वेगळे असले तरी राजकारणापलीकडे मैत्री जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या नेतृत्वाची अपेक्षा असलेला कर्तृत्ववान नेता गमावला आहे. त्यांनी केलेली विकासकामे, सामाजिक कार्य या कामांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे मत साताऱ्यात सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांची श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.