देशात फार मोठी मनगटशाही सुरू

डॉ. राजा दीक्षित; तिसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलनाचा समारोप
मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित.
मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित.Sakal

सातारा - देशातील मोठे-मोठे विचारवंत सध्याचे युग चिंतेचे व अस्वस्थता असल्याचे सांगतात. भारतात विविध धर्माचे लोक राहत असून बहुधार्मिकता असणाऱ्या देशात मंदिर, मशिदीवरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून होत असून, देशात फार मोठी मनगटशाही सुरू असल्याचे भाष्य सद्य:स्थितीत देशभरात सुरू असणाऱ्या घडामोडींवर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी आज केले.

येथील शाहू कलामंदिरात आयोजित तिसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, अध्यक्ष वसंत गुर्जर, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘साहित्य संमेलन आणि वाद असे समीकरण अलीकडच्या काळात वाढत आहे. संमेलनातून विचारमंथन होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होतो. साहित्य, लेखन, सामाजिक परिवर्तनासह विविध घटकांवर चर्चा करून समाजाला दिशा देण्याचे काम संमेलनातून होते. बहुसांस्कृतिकता आणि बहुधार्मिकता जपणे हे भारतासारख्या देशांमध्ये सर्वाधिक गरजेचे आहे. मात्र, आजच्या काळात सार्वत्रिक दुजाभाव आणि विषमता वाढत असून एकसंध राष्ट्र भावनेला हे घातक आहे. या स्थितीत विवेकी आणि संयमी आत्मभान पाहिजे. हे आत्मभान समाजाला देण्याची जबाबदारी साहित्यिकांवर आहे.’’

देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकशाहीचे लोकशाहीकरण होण्याची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘संमेलनाच्या माध्यमातून समाज विधायक वळणाने जाण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्‍यकता असून, विचार आणि विवेकाची सांगड घातल्यास समाजाला दिशा मिळेल. ग्रंथांची व्याख्या करता येत नसली तरी ग्रंथ आणि वाचन संस्कृती जोपासणे ही जाणीव व्हायला हवी. सातारा जिल्ह्यातील भिलारप्रमाणे प्रत्येक गाव पुस्तकांचे गाव व्हायला हवे. केरळमध्ये आणि काही युरोपीय देशांमध्ये ग्रंथ ही जशी जीवनावश्‍यक वस्तू बनली आहे, तसे आपल्याकडेही ग्रंथ जीवनावश्यक वस्तू बनली पाहिजे.’’ श्रीकांत देवधर यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com